बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के ; यंदा  पैकीच्या पैकी कोणालाच नाही, ३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के 

बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के ; यंदा  पैकीच्या पैकी कोणालाच नाही, ३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के 

पुणे : प्रतिनिधीआज दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. पण निकालाच्या दोन तास आधी शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली असून यामध्ये राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या नंतर आज सोमवारी (ता. ५ मे) दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. पण नेहमीप्रमाणेच, निकालाच्या दोन तास आधी म्हणजेच सकाळी ११वाजता शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली असून यामध्ये राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असल्याचे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, कोकण या नऊ विभागांमधून १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी ९१.८८ टक्के इतकी आहे. खासगी विद्यार्थ्यांची संख्या एकूण ३६ हजार १३३ इतकी होती, त्यापैकी ३५ हजार ६९७ जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी २९ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
त्यामुळे १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा दिलेल्या आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७३.७३ टक्के इतकी आहे. तर पुर्नपरीक्षा अर्थात ४२ हजार २४ रिपीटर्स विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ हजार ८२३ रिपीटर्स विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर्स विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी ३७.६५ टक्के इतकी आहे.
तसेच, यंदा बारावीच्या परीक्षेला ७ हजार २५८दिव्यांग विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विभागीय निकालाची माहिती देताना शिक्षण अधिका-यांनी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागल्याचे जाहीर केले. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूरमधून फक्त ८९.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याशिवाय, विज्ञान शाखा – ९७.३५ टक्के, कला शाखा – ८०.५२ टक्के, वाणिज्य शाखा – ९२.६८ टक्के असा निकाल लागला आहे. तर, व्यवसाय अभ्यासक्रमात ८३.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आयटीआयचे ८२.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागीय निकाल
पुणे – ९१.३२नागपूर – ९०.५२छत्रपती संभाजीनगर – ९२.२४मुंबई – ९२.९३कोल्हापूर – ९३.६४अमरावती – ९१.४३नाशिक – ९१.३१लातूर – ८९.४६कोकण – ९६.७४

यंदा  पैकीच्या पैकी कोणालाच नाही, ३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मागील वर्षापेक्षा यंदा कमी निकाल लागला आहे. तसेच यंदाच्या निकालात शंभर टक्के कोणालाही मिळवता आले नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची मंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यंदा मंडळाने बारावीच्या परीक्षाही लवकर घेतल्या होत्या.
बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. राज्यातील १ हजार ९२९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच ९० ते ९९.९९ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ४ हजार ५६५ आहेत.
शून्य टक्के निकाल किती कॉलेजचाराज्यात १० हजार ४९६कॉलेजातून विद्यार्थी बसले होते. त्यात शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ३८ आहेत. यंदा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी लागला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७% होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालाचा टक्का १.४९ ने कमी झाला आहे. यंदा २० हजार ९४३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काऊट गाईडचे गुणे मिळाले आहेत. यंदा तृतीयपंथी १८ विद्यार्थी बसले होते.

IMG-20240814-WA0262IMG-20240817-WA0005

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने  बारावीत मिळवले घवघवीत यश; भावूक होत म्हणाली,”कौतुकाची थाप मारायला माझे वडील नाहीत” मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने बारावीत मिळवले घवघवीत यश; भावूक होत म्हणाली,”कौतुकाची थाप मारायला माझे वडील नाहीत”
  बीड : -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदाही निकालात
बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के ; यंदा  पैकीच्या पैकी कोणालाच नाही, ३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के 
शिवसेना पक्ष ठाकरेंचा का शिंदेंचा?; ७ मे रोजी होणार सुनावणी
MIM च्या इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला धमकी
लेडी डॉन फिजा इराणीला अटक ; एम. डी. ड्रग जप्त
जालनाहून बीडला जाताना मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
हिंदू-मुस्लीम ऐक्य जोपासणे हीच भारताची अस्सल परंपरा.. - प्रा. जयदेव डोळे यांचे प्रतिपादन
Join Us on Whatsapp