जालनाहून बीडला जाताना मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
जालना : मराठा आरक्षणासाठी अथक लढा देणारे नेते मनोज जरांगे यांनी ‘मिशन मुंबई’ अंतर्गत २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. मराठवाड्यातील सततच्या बैठका आणि दौऱ्यांदरम्यान आज बीड दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत बिघडली.
जालन्यातून बीडला जाताना भोवळ आल्याने त्यांना दौरा रद्द करून छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. विनोद चावरे यांनी उपष्माघात (सनस्ट्रोक) आणि अतिसाराचा त्रास असल्याचे निदान करत काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला. सध्या मराठवाड्यात तीव्र उष्णतेमुळे प्रशासनाने दुपारी बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
जरांगे म्हणाले, “सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही, त्यामुळे मुंबईत आंदोलन अटळ आहे. २८ ऑगस्टला समाजाने मला मुंबईत सोडावे. पुढील रणनीती योग्य वेळी जाहीर करेन.” त्यांनी बांठिया आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करत जनगणनेची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. जरांगे यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली जात आहे. या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे, तर सरकारवर दबाव वाढला आहे.
About The Author

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List