हिंदू-मुस्लीम ऐक्य जोपासणे हीच भारताची अस्सल परंपरा.. - प्रा. जयदेव डोळे यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर:- ( दादासाहेब शिंदे )-
सृजन सांस्कृतिक मंच आणि महात्मा गांधी स्मारक निधी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 एप्रिल 2025 रोजी, महात्मा गांधी भवन,समर्थ नगर या ठिकाणी ईदमिलन व मिनाज लाटकर संपादित ईदोत्सव विशेषांक 'नब्ज' या विशेषांकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम 'नब्ज-ए-पहल' घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गोरडे सर हे होते, तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे सर, डॉ. मजिद शेख सर आणि नब्ज अंकाचे सहसंपादक कौस्तुभ पटाईत हे होते.
'भारताच्या इतिहासात उजव्या शक्तींनी एक कुटील डाव असून सबंध भारताची हिंदू-मुस्लिम ऐक्याची जी परंपरा होती, त्या परंपरेला मोडीत काढण्यासाठी जनमानसात मुस्लिम समुदायाबद्दल एक प्रकारचा नकारात्मक प्रतिकांचा वापर करून भारतीयांच्या मनात द्वेष पसरवण्याचे काम केलेले आहे.आज देखील ते याच प्रकारचा प्रचार करून हिंदू-मुस्लिम भाईचाऱ्याला तोडण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य जनतेत मुस्लिम समुदायाबद्दल कायम आपुलकी आणि प्रेमाचे संबंध आढळतात कारण हा सर्व कष्टकरी समाज आहे. परंतु जाणीवपूर्वक स्वतःच्या सत्तास्थानाला शाबूत ठेवण्यासाठी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला जात आहे आणि समाज मनात एक प्रकारची दुही पसरवली जात आहे. पण भारतीय जनता या द्वेषाच्या प्रचाराला कधीही बळी पडणार नाही, असे प्रतिपादन प्रा. जयदेव डोळे सर यांनी आपल्या भाषणात केले.
'नब्ज'चे सहसंपादक कौस्तुभ पटाईत यांनी हा विशेष अंक काढण्यासाठीची भूमिका विस्तृतपणे मांडली. त्याचबरोबर त्यांनी नुकताच काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे जखमी झालेले आहेत त्यांची कशा प्रकारे सद्भावना दाखवत येथील मुस्लिम समुदायाने तत्परतेने मदत केली याबद्दल मांडणी केली. त्याचबरोबर अशा प्रकारची सौहार्यता ही या देशाच्या जमिनीत मुरलेली आहे आणि ती आपल्या देशाच्या प्रत्येक भागात पाहायला मिळते. ही खऱ्या अर्थी आपल्या देशाची संस्कृती आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.
डॉ. मजीद सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आधुनिक काळात जर आपल्याला तगून राहायचे असेल तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनासह, बहुभाषिकतेला अंगीकारावे लागणार आहे. त्याचबरोबर धर्म ही केवळ ज्याची त्याची वैयक्तिक श्रद्धा असलेला विषय आहे. धर्म हा कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक जीवन व्यवहारात उतरता कामा नये, अन्यथा आपल्या संविधानातील तत्त्वाचे उल्लंघन होईल, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मच्छिन्द्र गोरडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले की, सत्य हे वारंवार ठासून सांगणे सध्याच्या काळात क्रमप्राप्त झालेले आहे. कारण असत्य हे संपूर्ण शहरभर पसरलेले आहे. म्हणून आपण सत्याचा प्रसार करत राहणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन सांस्कृतिक मंचच्या सुनीता लोंढे यांनी केले त्यात त्यांनी सृजन सांस्कृतिक मंच समाजामध्ये ऐक्य टिकावे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मदतीने सातत्याने प्रयत्न करत असते, अशी भूमिका मांडली.
कार्यक्रमात सहभागी महिलांनी माणुसकी हाच धर्म आहे आणि कोणताही धर्म द्वेष करण्याचं शिक्षण देत नाही उलट प्रत्येक धर्म प्रेमाचं संदेश देतो असं मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फातिमा मॅडम यांनी आपल्या अस्खलित उर्दू शैलीत केले. तसेच कार्यक्रमाचे आभार पत्रकार हनुमान लव्हाळे यांनी मांडले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजेंद्र प्रधान, अरुण मते, सत्यजित म्हस्के, प्रतीक बोर्डे, रमेश जोशी, दादासाहेब शिंदे, योगेश खोसरे आशिष जाधव, आयटी कॉर्नरचे रज्जाक शेख,रवी मोताळे, शाहीस्ता मॅडम, उषा खंडागळे मॅडम, सुलताना मॅडम आदींनी परिश्रम घेतले.
About The Author

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List